Category मुंबई

निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद ; लोकसभा निवडणूक झाली जाहीर.

रत्नागिरी – सिंधुदुर्ग ७ मे रोजी मतदान महाराष्ट्रात ५ टप्प्यात होणार मतदान ४ जूनला लागणार निकाल मुंबई (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आजपासून आचारसंहिता जाहीर करण्यात आली. आता ४ जूनला मतमोजणी होणार असून त्यादिवशी नवीन सरकार बसणार आहे. दरम्यान…

निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद, लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होणार

मुंबई (ब्युरो न्युज) : लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्या जाहीर होणार आहेत. उद्या दुपारी ३ वाजता निवडणुक आयोगाची पत्रकार परिषद आहे या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहिर केल्या जातील. त्यानंतर देशतात आचारसंहिता लागू होईल. दिल्लीत आज निवडणूक आयोगाची बैठक पार…

कणकवली विधानसभेतील चाकरमान्यांनी केला निर्धार … विनायक राऊत यांनाच करणार पुन्हा खासदार

शिवसेना भवन येथील मेळाव्याला मुंबईस्थित चाकरमान्यांचा प्रचंड प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) : कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघातील मुंबईस्थित चाकरमान्यांचा मेळावा 13 मार्च रोजी शिवसेना भवन येथे संपन्न झाला. या मेळाव्यात रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार विनायक राऊत यांना पुन्हा एकदा मोठ्या…

राज्यातील 1 हजार 300 अभियंता उद्या होणार शासकीय सेवेत दाखल

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते देणार नियुक्तीपत्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राबविण्यात आली होती राज्यस्तरीय भरतीप्रक्रिया मुंबई (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम खात्याकडून राबविण्यात आलेल्या राज्यस्तरीय कनिष्ठ अभियंता आणि सहाय्यक कनिष्ठ अभियंता पदावरील पात्र ठरलेल्या एकूण 1…

माझा बळी पाहिजे, देतो… देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले

ब्युरो न्युज (मुंबई) : मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा समाजाला संपवण्याचं काम सुरू असून आपल्याला सलाईनमधून विष देण्याचा डाव आहे म्हणूनच सलाईन घेणं बंद केलं असा आरोप करत मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य…

राज्यातील वीज ग्राहकांच्या घरी लागणार स्मार्ट मीटर

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील वीज ग्राहक आता स्मार्ट होणार आहे. ग्राहकांच्या वीजबिलातील गोंधळ संपवण्यासाठी महावितरणने तब्बल दोन कोटी ४२ लाख वीज ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वीज वापराचे स्वयंचलितपणे अचूक मीटर रिडिंग होणार असल्याने ग्राहकांना त्यांनी…

माकड , वानरांचे निर्बीजीकरण होणार टास्क फोर्सची स्थापना

मुंबई (प्रतिनिधी) : माकड आणि वानरांचा कोकणात खूपच उपद्रव आहे. त्या साठी काय करायचे या साठी समिती नेमली होती. समितीने आता माकड व वानर यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी टास्क फोर्सची निर्मिती केली आहे.याची जर का अंलबजावणी झाली तर कोकणात माकड व…

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रखडलेल्या कामांना वर्कऑर्डर द्या

आ. वैभव नाईक यांची ना. गिरीश महाजन यांच्याकडे मागणी मुंबई (प्रतिनिधी) : आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची मंगळवारी मुंबईत भेट घेऊन महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंजूर झालेल्या कामांना वर्कऑर्डर देऊन…

भूमिका पांचोली मिसेस मिडल ईस्ट 2024 ची मानकरी!

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईची भूमिका पांचोली मिसेस मिडल ईस्ट 2024 च्या स्पर्धेत विजयी ठरली आहे. भूमिका पांचोली आणि तिच्या कुटुंबासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. २८ जानेवारी रोजी यूएई मध्ये सदर स्पर्धा प्रथमच आयोजित करण्यात आली होती. भूमिका मूळ मुंबईची आहे…

NCP अजित पवारांची, शरद पवार गटाचे आमदारही पात्र !

ब्युरो न्युज (मुंबई) : राष्ट्रवादी आमदार अपात्र सुनावणीचा निकालाबबात मोठी अपडेट समोर आली आहे. अजित पवार गट हाच मुळ राष्ट्रवादी पक्ष आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवणारा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालाचे…

error: Content is protected !!