कणकवली (प्रतिनिधी) : ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या वैभववाडी तालुकाध्यक्षपदी कोकण रेल्वे मार्गावर शुभारंभ होत असलेली वंदे भारत एक्सप्रेस उद्या दुपारी 12.30 वाजता कणकवली रेल्वे स्टेशन मध्ये दाखत होत असून सर्वात वेगवान असलेली ही कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस चे स्वागत करण्याकरिता कणकवली शहरवासीयांनी कणकवली रेल्वे स्टेशनवर 12 वाजता उपस्थित रहा. असे आवाहन कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ कणकवली रेल्वे स्टेशनवर या विशेष रेल्वे थांबा देण्यात आला असून, हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीला बहुमान देण्यात आला आहे. त्यामुळे या रेल्वेचे स्वागत करत असताना या ऐतिहासिक क्षणाचे कणकवलीकरांनी साक्षीदार व्हा, असे आवाहन श्री नलावडे यांनी केले आहे.