सत्तेच्या हव्यासापोटी ना. मुश्रीफांनी विचारधारेला तिलांजली दिली : आप
कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : महाराष्ट्राला एक सुसंस्कृत, वैचारिक व विचारधारेला धरून राजकारण करण्याची परंपरा लाभली होती. राज्यात झालेल्या राजकीय घडामोडीमुळे पाहता राजकारणातील ‘विचारधारे’ची संकल्पना संपुष्टात येऊन फक्त आणि फक्त सत्ता हस्तगत करण्यापुरतंच राजकारण उरलं आहे हे आता स्पष्ट झालं आहे.…