आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

खोकुर्ले, मांडुकली रस्त्यावर पुराचे पाणी

गगनबावडा कोल्हापूर महामार्गावरची वाहतूक ठप्प वैभववाडी (प्रतिनिधी) : गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर  खोकूर्ले, मांडूकली, किरवे दरम्यान रस्त्यावर पुराचे पाणी आल्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी मंगळवारीही या महामार्गावरची वाहतूक ठप्पच आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कुंभी…

संततधार पावसाने वैभववाडीत जनजीवन विस्कळीत ; गोठ्यावर झाड कोसळून हजारोंचे नुकसान

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यात गेले आठ दिवस पावसाची संततधार सुरू आहे. सोमवारी पहाटे झालेल्या वादळी वाऱ्यामुळे नावळे धनगरवाडा येथील श्रीरंग यशवंत रावराणे यांच्या गोठ्यावर सागाचे झाड पडून गोठ्याचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने गोठ्यात असलेली गाय वाचली आहे. मुसळधार पावसामुळे…

केंद्र शासनाच्या माध्यमातून 1200 कोटी निधी उपलब्ध

सिंधुदुर्ग किनारपट्टी भागात वीज वाहिन्या भूमिगत होणार अधिक क्षमतेच्या ट्रान्सफार्मरची उभारणी होणार जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक सावंत यांची माहिती चौके (अमोल गोसावी) : केंद्र शासनाच्या माध्यमातून उपलब्ध 1200 कोटी निधीतून सिंधुदुर्ग किनारपट्टी भागातील वीज वाहिन्या भूमिगत केल्या जाणार असून…

रत्नागिरी महामार्गावर केर्ली दरम्यान पुराचे पाणी महामार्गावर

पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे केली बंद काेल्हापुर (रोहन भिऊंगडे) : कोल्हापूर,रत्नागिरी महामार्गावर केर्ली ते केर्ले दरम्यान पुराचे पाणी महामार्गावर आल्यामुळे पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक दुपारी दोन वाजले पासून पूर्णपणे बंद केली. पावसाचा जोर वाढल्याने आज (मंगळवारी) सकाळीच या रस्त्यावर…

मसुरे देऊळवाडा शाळेत “एक दिवस बळीराजासाठी” उपक्रम!

मसूरे (प्रतिनिधी) : विद्यार्थी जीवनापासूनच शेतीविषयक आवड निर्माण व्हावी, शेतीतील विविध टप्प्यांची माहिती व्हावी यासाठी दरवर्षी ‘एक दिवस बळीराजासाठी’ हा उपक्रम सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत घेण्यात येतो. शेतात मिळणारा हा आनंद फक्त आणि फक्त गाव खेड्यातील मुलंच अनुभवू शकतात…

परिस्थितीशी लढता लढता निसर्ग कोपला

त्रिंबक येथील तारामती गावडे यांचे वादळी वाऱ्याने घराचे छप्पर उडाले शिवसेना आचरा विभाग प्रमुख चंद्रकांत गोलतकर यांचे शासनाच्या वतीने मदत मिळवून देण्याचे आश्वासन आचरा (प्रतिनिधी) : सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आलेल्या तुफानी वादळी वाऱ्याने पळसंब व त्रिंबक मध्ये मोठया प्रमाणात…

पंचगंगा नदीने गाठली इशारा पातळी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीने कालच इशारा पातळी गाठली. सध्या नदीची वाटचाल धोक्याच्या पातळीकडे सुरु झाली. त्यामुळे नदी परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. आज दुपारी 12 वाजता राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 41 फुट होती.…

काळसे वादळातील नुकसानग्रस्तांच्या मदतीला धावले आमदार वैभव नाईक

जितेंद्र प्रताप बागवे आणि ज्योती सुधाकर कदम यांना दिली तातडीची आर्थिक मदत आणि ताडपत्री चौके (अमोल गोसावी) : वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे काळसे गावातील नुकसानग्रस्त नागरीकांच्या मदतीला आमदार वैभव नाईक धावून आले असून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मार्फत काळसे ग्रामपंचायती नजीक…

सर्पमित्र रमण पेडणेकर यांना मातृशोक

मसूरे (प्रतिनिधी) : मसूरे कावावाडी येथील सौ. निर्मला चंद्रकांत पेडणेकर (77वर्ष ) यांचे वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, विवाहित मुलगी, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. सर्पमित्र रमण पेडणेकर यांच्या मातोश्री तर मुंबई प्रसिद्ध चित्रकार-मूर्तिकार ज्ञानदेव हडकर यांच्या…

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा काळसे गावाला तडाखा

ग्रामपंचायत इमारतीसह अनेक घरांवर झाडे पडुन, लाखोंची हानी; वीज वितरणचेही नुकसान चौके (अमोल गोसावी) : सोमवार दिनांक २२ जुलै रोजी सायंकाळी आणि मंगळवार दिनांक २३ जुलै रोजी सकाळी आलेल्या चक्रीवादळ सदृश्य वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा जोरदार फटका मालवण तालुक्यातील काळसे…

error: Content is protected !!