सावडाव स्मशानभूमीतील रस्ता अतीक्रमण व भ्रष्ट्रचार संदर्भात असलेने आरोप लोकांयुक्त व उप लोकायुक्तांकडून फेटाळले

कणकवली (प्रतिनिधी) : सावडाव स्मशानभूमी संदर्भात सदर रस्ता कामात भ्रष्टाचार झाला असून सदर काम चुकीच्या पद्ध‌तीने केले गेले असा आरोप नयना वैभव सावंत यांनी सावडाव ग्रामपंचायतवर केला होता. त्यासाठी लोक उपायुक्त महाराष्ट्र राज्य यांच्याकडे तक्रार केली होती. सदर तक्रारीवर 20.07.2024 रोजी आयुक्त कार्यालयात सुनावणी झाली सदर सुनावणीत लोकायुक्त व्ही. एम् कानडे यांनी ताशेरे ओढली असून सदर रस्ता सावडाव गावासाठी अत्यावश्यक सेवेत आहे. सदर रस्ता स्मशानभूमीकडे जात असून 1992-93 ला ग्रामपंचायत दप्तरी तशी नौद आहे स्मशानभुमीकडे जाताना चिखलाचा रोड आहे त्यामुळे ग्रामस्थांना खुप कष्ट होतात काहीनी रोड बंद केला आहे हे चुकीचे आहे. त्यामुळे झालेले काम योग्य असून सदरील रस्ता ग्रामस्थांसाठी लवकरात लवकर खुला करावा, ग्रामपंचायत सावडाव यांनी नियमांचे पालन करूण सदर काम केले आहे. त्यामुळे सदरची तक्रार बंद / निकाली काढ‌यात येत आहे. व केलेली तक्रार ही खोडसाळ व लोकांना त्रासदायक आहे. असे सावडाव सरपंच आर्या वारंग यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!