धावत्या रेल्वेतून पडून चिंदरचा युवक ठार

मालवण (प्रतिनिधी) : चिंदर येथील सामाजिक कार्यकर्ते, प्रथितयश व्यावसायिक, वैभवशाली पतसंस्थेचे संचालक संदिप हरी पारकर (वय ५८ रा. चिंदर भटवाडी) यांचे गुरुवारी सकाळी रेल्वेतन पडून निधन झाले. त्याच्या अपघाती मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.

कणकवली तालुक्यात साकेडी येथील घटना…

मंगलोर रेल्वेने मुंबईहून कणकवलीच्या दिशेने येत असताना रेल्वेतून तोल जाऊन पडल्याने संदीप हरी पारकर (५८. चिंदर भटवाडी, मालवण) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज – सकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास कोकण रेल्वे मार्गावर कणकवली तालुक्यात साकेडी – बोद्धवाडी दरम्यान घडली.

संदीप पारकर हे रेल्वेतून खाली पडल्याचे रेल्वेतील प्रवाशांनी पाहिले. त्यानंतर याबाबत कणकवली रेल्वे स्टेशनला माहिती दिली. कणकवली रेल्वे पोलीस व कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मात्र संदीप यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले.

NEW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!