सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी केलेले युद्ध, पराक्रम याचे साक्षीदार म्हणजे आपले गडकिल्ले! महाराष्ट्रात एकूण 350 पेक्षा जास्त किल्ले आहेत. त्यातील किल्ले सिंधुदुर्गसह रायगड, शिवनेरी, तोरणा, लोहगड, साल्हेर, खांदेरी, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, या 12 किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठीचा प्रस्ताव भारत सरकारने युनेस्कोला सादर केला
जागतिक वारसा स्थळ यादीत या किल्ल्यांचा समावेश झाल्यास खूप सकारात्मक परिणाम होऊ शकतात. या स्थळांना आंतरराष्ट्रीय मान्यता आणि कायदेशीर संरक्षण मिळेल व त्यांच्या संवर्धनासाठी निधी मिळू शकेल.












