पोलिसांनी पत्रकारांवर केला लाठीचार्ज
काेल्हापुर (प्रतिनिधी) : विशाळगडाकडे जाणाऱ्या लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यम प्रतिनिधींना पोलिसांनी अडवल्यामुळे पोलिस आणि पत्रकार यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक वादावादी आणि धक्काबुक्कीचा प्रकार घडला. चाकू आणि तलवारी घेवून जाणाऱ्यांना पोलिसांनी विशाळगडकडे सोडलं, मात्र आम्ही कागद आणि पेन घेवून जात असताना आमची अडवणुक का करता, असा पत्रकारांनी पोलिसांना सवाल केला. यावेळी पोलिसांनी पत्रकारांवर लाठीचार्जही केला.











