कृषी महाविद्यालयात उभारला शेतीतील पालापाचोळा व घनकचऱ्यापासून कंपोस्ट प्रकल्प

नांदगाव(प्रतिनिधी): कै राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथील चतुर्थ वर्ष कृषी पदवीच्या अनुभवात्मक शिक्षण उपक्रम अंतर्गत कृषी घनकचरा प्रकल्पाचे यशस्वीरित्या अमलात आणले आहे. या प्रकल्पाच्या मदतीने आपण कृषी व महानगरपालिका घनकचऱ्याचे व्यवस्थापन उत्कृष्ट रित्या करू शकतो हे दाखवून दिले आहे. या प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांनी कृषी घनकचरा व महानगरपालिका घनकचरा यांच्यापासून कंपोस्ट खत तयार केले आहे.अशाप्रकारे खत निर्मितीतून मोठा नफा मिळतो. तसेच हा प्रकल्प कृषी पूरक आहे. अशाप्रकारे कृषी पूरक खताच्या वापरामुळे जमिनीची सुपिकता वाढण्यास मदत होते.यावेळी सहाय्यक प्राध्यापक आकाश पवार, सहाय्यक प्राध्यापिका पाटणकर तसेच पेडणेकर सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.

error: Content is protected !!