कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील ॲड. मेघना देऊ सावंत यांची भारत सरकारच्या नोटरीपदी निवड करण्यात आली आहे. कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावच्या मूळ रहिवासी असलेल्या ॲड. मेघना ह्या मागील १९ वर्षे कणकवली येथे वकिली व्यवसाय करत आहेत. आपल्या नुकतीच त्यांची भारत सरकारच्या नोटरीपदी निवड करण्यात आली आहे. नोटरीपदी निवड झाल्याबद्दल ॲड. मेघना सावंत यांचे अभिनंदन होत आहे.
ॲड.मेघना सावंत यांची नोटरीपदी निवड
