ज्ञानोबा माऊली – तुकाराम”! च्या जयघोषात वैभववाडीतून पायी कोकण दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ

वैभववाडी (प्रतिनिधी) : एकात्मता वारकरी संप्रदाय आयोजित कोकण दिंडीचे वैभववाडीत जोरदार स्वागत करण्यात आले. “ज्ञानोबा माऊली… तुकाराम!” या जयघोषाने वैभववाडी शहर भक्तिरसाने न्हाऊन निघाले. देवगड–बापार्डे,  येथून बुधवारी निघालेली ही पायी वारी शुक्रवारी सायंकाळी वैभववाडीत दाखल झाली.       
येथील संभाजी चौकात पार पडलेल्या रिंगण सोहळ्यात सहभागी झालेला अश्व सर्वांचेच आकर्षण ठरला. टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि संत नामस्मरणाच्या गजरात परिसर भक्तिमय झाला होता.या प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष हभप विश्वनाथ महाराज गवंढळकर, कार्याध्यक्ष हभप संतोष राऊळ, खजिनदार हभप मधुकर प्रभूगावकर, सचिव गणपत घाडीगावकर, तसेच सदस्य प्रकाश सावंत व राजेश पडवळ यांनी उपस्थित राहून दिंडीचे स्वागत केले. कोकण दिंडीत सहभागी सर्व वारकऱ्यांना हभप श्री. गवंढळकर महाराज यांनी शुभेच्छा दिल्या.

या दिंडीत एकात्मता वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष हभप गणेश गिरकर, उपाध्यक्ष रवींद्र पाटकर, सचिव अनिल पाळेकर, सहसचिव राजेश पडवळ, संजय नाईकधुरे, संजय गुरव, प्रकाश सुतार यांच्यासह अनेक वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.कोकण दिंडीची ही पायी वारी भक्ती, एकात्मता आणि संत परंपरेचा अखंड वारसा जपत पंढरपूरच्या दिशेने पुढे निघाली आहे.

error: Content is protected !!