बांदा (प्रतिनिधी) : येथील व्ही.एन.नाबर गुरू पौर्णिमा उत्साहात माणसाच्या जीवनात गुरूला खूप महत्त्व आहे. शिक्षकांना वैदिक काळापासून गुरूचे स्थान आहे. त्यांच्या ॠणांतुन आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. व्ही.एन.नाबर विद्यासंकूलात ह्याच गुरूंविषयी आदर प्रेमभाव व्यक्त करण्यासाठी गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी जगतगुरु व्यास मुनींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली.यावेळी सर्व शिक्षक तिथे उपस्थित होते. ज्यांचे नाव आपल्या शाळेला देण्यात आले आहे ते गुरू व्ही.एन.नाबर म्हणजेच विश्राम नृसिंह नाबर सर यांच्या ॠणांतुन शाळा कधीच मुक्त होऊ शकत नाही, त्यांचे मार्गदर्शन व सहकार्याची आठवण म्हणून त्यांना मानवंदना देण्यात आली. प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. इयत्ता पाचवी च्या विद्यार्थ्यांनी” गुरूने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा ” हे गीत गायन सादर करून गुरू वंदना दिली.
यानंतर विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना गुलाबपुष्प व भेटकार्ड देऊन सर्वांचा आशिर्वाद घेतला. स्नेहा नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि मुलांनी भविष्यात कोणती काळजी घ्यावी याबद्दल थोडक्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या आई वडीलांचे आणि आपल्या आयुष्यातील सर्व गुरूंचे उपकार आपल्या वर कायम असतात आणी ते उपकार कधीच विसरू नयेत, असे देखील सांगितले. यानंतर उपमुख्याध्यापिका शिल्पा कोरगावकर यांनी आपले मनोगतपर भाषण व्यक्त करताना शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंच्याप्रती कायम आदर बाळगून आपलं काम चोख बजावले पाहिजे तरच आयुष्यात आपण यश संपादन करू शकतो, असा मोलाचा सल्ला दिला. यासोबत त्यांनी सप्त ऋषी यांची माहिती देऊन जीवनातील गुरूंचे महत्व प्रतिपादन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववी ची विद्यार्थ्यीनी कु. सेजल सखाराम सावंत आणि आभार इयत्ता नववी चा विद्यार्थ्यी कु. ऋतुराज दिगंबर नाईक याने व्यक्त केले. प्रशालेचे विद्यार्थी विरांश विक्रम परब व विदुला विक्रम परब यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दत्तगुरू यांची मूर्ती शाळेला भेट म्हणुन दिली. हा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा मोलाचा सहभाग लाभला.













