वैभववाडी (प्रतिनिधी): काल देवगड शहरातील ग्रामीण रुग्णालयातील तरुणाचे आंदोलन हाणून पाडण्यासाठी केलेला हल्लागुल्ला “, याचेवर शिवसेना उद्द्व बाळासाहेब पक्षाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री संदीप सरवणकर यांनी तिखट प्रतिक्रिया देताना म्हंटले की,”चाणक्य म्हणाले होते की, जेव्हा राजा व्यापारी बनतो, तेव्हा प्रजा भिकारी बनवतो.”,त्या प्रमाणे, आधी कोंबडी,नंतर बार ,हॉटेल,मॉल, तांत्रिक कॉलेज आणि आता जंगी हॉस्पिटल ह्याचा राजकारणाचे जोडीने बाजार करणारे राजकीय नेते ह्यांचे इशाऱ्यावर अंगावर जाणारे पाळीव स्वानानी ,सर्व जिल्ह्यातील सरकारी रुग्णालय बंद पडावे व मग, पडवेतील आपले मालकाचा बाजार जोरात चालेल, ह्याच कपटाने कालचा हल्ला गुल्ला करून सरकारी रुग्णालयातील अवस्थेचा परदाफर्श करणारे तरुणांचा दमनशाही ने आवाज बंद करण्याचा केलेला प्रयत्न हा, लोकशाहीचा प्रक्षोभशाही करण्याचा चाललेला डाव आहे. बाळासाहेब म्हणत, जर डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, वकिलाचा मुलगा वकील, तर गुन्हेगाराचा मुलगा हा गुन्हेगारच नीपजांनार खरतर पोलिसाचे संरक्षणात त्याचे साक्षीने केलेली गुंडगिरी घाबरगुंडगिरी आहे. यांचेवर दंगल घडवून आणण्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.असे ही त्यांनी म्हंटले.परंतु मिंदे सरकार व त्यांचे अधिकारी डिम्म आहेत . हे जनता समजून गेली आहे. त्यासाठी जिल्ह्यात व वैभववाडीत सुद्धा पुन्हा सैनिकांचे शासनाचे वाभाडे काढत आंदोलन होणार आहे.तेव्हा बटकया स्वाना नी असा प्रयत्न करण्यापूर्वी आपल्या तंगड्या चा विमा उतरावा हा कडक इशारा दिला.
आपल्या मालकाचा बाजार चालावा म्हणून बटक्या स्वानांचा देवगड ला तरुणांवर केलेला हल्लागुल्ला सुनियोजित – संदिप सरवणकर











