कोल्हापुर (रोहन भिऊंगडे) : छत्रपती शिवाजी पुलावर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभा करा, अशी मागणी ठाकरे गटाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी निवेदनाद्वारे खा. शाहू महाराज छत्रपती यांच्याकडे केली मागणी.
छत्रपती शाहू महाराजांच्या समतेचा विचार भारताला आदर्शवत ठरलेल्या करवीर भूमीने कला-क्रीडा-सहकार-उद्योग आणि सांस्कृतिक क्षेत्रात स्वकर्तृत्वावर भरारी घेतलेली आहे. अशा शुरवीर ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या कोल्हापूरच्या वरददायीनी ठरलेल्या पंचगंगा नदीच्या काठावर जुने आणि प्राचीन कोल्हापूर असणाऱ्या ब्रम्हपूरी टेकडीजवळ हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ भव्य पुतळा असणे गरजेचे आहे. देशासह राज्यातून कोल्हापुरात अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. किल्ले पन्हाळगड, विशाळगड, पावनगड आणि स्वराज्य जल आरमार साक्ष असणाऱ्या कोकण भूमीच्या प्रवेशव्दारावर
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ऐतिहासिक वैभवात भर टाकणार असल्याचं निवेदनात म्हटल आहे.