सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा विकास आराखडा संबधी महत्वाची बैठक मुंबई येथे संपन्न झाली. या बैठकीत विकास आराखड्यासंबंधी महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली असून विविध यॊजनांद्वारे विकास कसा साध्य करता येईल, यावर मते घेण्यात आली. त्यामुळे अर्थात विकासाचा ‘बूस्टर डोस’ मिळाला आहे.
या बैठकीला केंद्रीय मंत्री नारायण राणे, महाराष्ट्राचे उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिंधुदुर्ग पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, आमदार निरंजन डावखरे, आम. वैभव नाईक, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी खासदार सुधीर सावंत, शिंदे गट जिल्हाध्यक्ष संजय आग्रे आदी उपस्थित होते.