अभि लाड हे आयत्या बिळावरचे नागोबा,टेंडर साठी लाचार असणाऱ्यांनी नितीन पवार यांच्यावर बोलू नये-छोटु पांगे

आमदार वैभव नाही हेच जनतेच्या आशीर्वादाने या जिल्ह्याचे उद्याचे पालकमंत्री

 मालवण (प्रतिनिधी) : खासदार नारायण राणे यांचे कट्टर समर्थक नितीन पवार यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. यावर भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अभी लाड यांनी बोचरी टीका केली होती.आज या टीकेचा चांगलाच समाचार आचरा उपशहरप्रमुख छोटु पांगे यांनी घेतला आहे.

यावेळी बोलताना पांगे म्हणाले की नितीन पवार हे प्रामाणिक कार्यकर्ता कशाचीही अपेक्षा न करता एक शेतकरी आहेत. प्रामाणिक कार्यकर्ता पक्षाला माहित नसतो कारण अभी लाड सारखे शायनर हेच आयत्या बिळावरचे नागोबा दिसतात टेंडरसाठी लाचारी करणारे, नेत्यांनी दिवसभर भेट दिली नाही तरी टेंडरसाठी बंगल्याची राखण करतात. अभी लाड यांनी दुसऱ्याची पात्रता काढण्यापेक्षा स्वताची लायकी बघावी राणे साहेबांच्या पडत्या काळात मुंबईत लपून बसणारे नाराजीचा सूर लावणारे लाड कुटुंबीय पाऊस पडला की बेडूक ओरडतात. तशी परिस्थिती अभी लाड यांची आहे उद्या विधानसभेच्या पराभवानंतर अभी लाड टेंडर साठी स्वतःच्या नेत्यांची ओळखही सांगणार नाहीत. श्रावण ग्रामपंचायत एक हाथी शिवसेनेकडे आहे याचही भान अभी लाड याना असेलच आमदार वैभव नाईक हेच जनतेच्या आशीर्वादाने या जिल्ह्याचे उद्या पालकमंत्री असतील हे निश्चित आहे असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!