अखंड रामचरितमानस पाठ निमित्ताने होणार महाभंडारा
मुंबई (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील वरवडे गावचे सुपुत्र अचित सूर्यकांत कदम आणि सुरेंद्र समरू यादव यांच्या वतीने श्री तुलसी मानस मंडळ बदलापूर यांच्या वतीने सार्वजनिक अखंड रामचरितमानस पाठ निमित्त महाभंडारा चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार 5 जानेवारी रोजी 7 ते 10 या वेळेत उल्हास नदी, नायरा पेट्रोल पंप, रमेशवाडी बदलापूर वेस्ट येथे महाभंडारा चे आयोजन करण्यात आले आहे. या महाभंडारा चा लाभ अडीच हजारहून अधिक भाविकांना होणार आहे.












