सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कोकण किनारपट्टीवर सोमवार दि. १८ ऑगस्ट ते शुक्रवार दि. २२ ऑगस्ट दरम्यान वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. या कालावधीत समुद्रातील वाऱ्याचा वेग ४५ ते ५० कि.मी. प्रती ताशी राहणार असून तो ६५ कि.मी. प्रती ताशी पर्यंत जाण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला असून या कालावधीत समुद्र वादळी वाऱ्यासह खवळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांनी हवामान बदलांवर लक्ष ठेवून सुरक्षेच्या कारणास्तव खोल समुद्रात जावू नये. तसेच किनाऱ्यालगतच्या नागरिकांनीही खबरदारी घ्यावी.
कोकण किनारपट्टीवर १८ ते २२ ऑगस्ट दरम्यान वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीची शक्यता











