भुईबावाडा घाट 29 सप्टेंबर पर्यंत अवजड वाहतूकीस बंद…

जिल्हाधिकारी अनिल पाटील यांचे आदेश

वैभववाडी (प्रतिनिधी) : सोमवारी सायंकाळी भुईबावडा घाटात झालेल्या ढग फुटीने घाट रस्त्यांची दैना उडाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घाटातील दरडी हाटविण्यात आल्या आहेत. त्यामुळे मंगळवारी सायंकाळपासून हलकी वाहतूक सूरू करण्यात आली आहे. मात्र मोरीचा पाईप वाहून गेल्यामुळे रस्त्याला भगदाड पडल्यामुळे घाटातून एसटी बस सह अवजड वाहतूक दिनांक 24 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर रात्री 12 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. करूळ घाटही बंद असल्यामुळे या घाटातील वाहतूक फोंडाघाट व अनुस्कुरा घाट मार्गे वळवण्यात आली आहे.

संरक्षक भिंतीच्या बाजूचा रस्त्याचा काही पृष्ठभाग त्याखालील मातीच्या भरावासह पूर्णतः वाहून गेला असल्यामूळे रस्त्याला मोठे भगदाड पडले आहे.  मो-याच्या ठिकाणी असलेल्या दोन रांगांच्या  पाईपपैकी एका रांगेचे  पाईप काही भागात तुटून वाहून गेले असून हेडवॉल पूर्णपणे पडली आहे. या भागात आजही पाऊस सुरू असून पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून जात आहे. मोरीच्या वरील बाजूला मोठ्या प्रमाणात दगड मातीचा ढीग जमा झाला आहे. रस्त्याचा पृष्ठभाग अस्तित्वात सुमारे २.७० मी. इतक्या रुंदीचा राहिला असल्याने या भागातून मोठी वाहने जाणे अपघाताला कारण ठरु शकण्याची शक्यता असल्याने सद्यस्थितीत या भागातून (घाटरस्त्यामधून) केवळ हलक्या स्वरूपाच्या प्रवासी वाहतूकीला परवानगी देऊन इतर वाहतूक फोंडाघाट मार्गे अथवा अनुस्कुरा घाट मार्गे वळविणेबाबत विनंती केलेली आहे.

भुईबावडा घाट रस्त्यावरून होणारी जड अवजड वाहनांची वाहतूक दिनांक २४/०९/२०२४ रोजी रात्री ०८:०० वा. पासून दिनांक २९/०९/२०२४ रात्री १२:०० वा. पर्यंत बंद ठेवून सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहतुकीकरिता बंद करण्याचे आदेश जारी करीत आहे. सदर मार्गावरून हलक्या वाहनांची वाहतूक चालू राहील.असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!