निलेश राणेंनी ठाकरेंना केले टार्गेट
कुडाळ (प्रतिनिधी) : पत्रकार मला विचारतात की ठाकरेंशी तुमची एवढी दुश्मनी का ? जुहू मधील आमचे राहते घर पाडण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे सरकार असताना झाला. पण कोर्टाने आम्हाला न्याय दिला. आमचे जुहू मधील घर वैध ठरवले. मी सांगतो की आमची ठाकरेंशी कसली दुश्मनी नाही.त्याहीपेक्षा ठाकरेंची आता तेव्हढी लेव्हलही राहिली नाही असा हल्लाबोल करत निलेश राणे यांनी ठाकरे कुटुंबावर टीका केली. आम्ही अंगावर जात नाही पण ऍक्शन ला रिऍक्शन तर देणारच.











