देवगड (प्रतिनिधी) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जुन रोजी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते मिठबांव (रेडेकोंड ग्राऊंडशेजारी) येथे कांदळवन वृक्षलागवड करण्यात येणार आहे.
किनारी प्रदेशातील जीवन आणि तेथिल स्थानिकांच्या उपजिविकेसाठी महत्वाच्या असलेल्या कांदळवनाच्या संरक्षण आणि संवर्धनाला केंद्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य देत चळीहींळ ही योजना ५ जून २०२३ रोजीच्या जागतिक पर्यावरण दिनापासून राबविण्याचे नियोजले आहे.ही योजना देशातील ९ किनारी राज्य व ४ केंद्रशासीत प्रदेशांमध्ये राबविली जाणार आहे.
या अनुषंबाने ५ जुन रोजी देशातील एकूण ७५ स्थळांवर व त्यातील महाराष्टड्ढातील १५ स्थळांवर कांदळवन रोपवन केले जाणार आहे.यात महाराष्टड्ढात एकूण ५५.२८ हेक्टर कांदळवन क्षेत्रावर हे रोपवन केले जाणार आहे.त्यापैकी qसधुदूर्ग जिल्ह्यातील मिठबाव येथे ५ जुन रोजी सकाळी १० वाजता आमदार नितेश राणे यांच्या हस्ते कांदळवन वृक्षारोपण केले जाणार आहे.या योजनेमुळे कांदळवनांचे संवर्धन होवून स्थानिकांना नवीन उपजिविकेच्या संधी उपलब्ध होतील तसेच निसर्ग पर्यटनाला चालना मिळेल अशी अपेक्षा कांदळवन कक्ष मालवण वनक्षेत्रपाल प्रदीप पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.