मनसे आमदार राजू पाटील यांच्या जागर यात्रेला सुरुवात
ब्युरो न्युज (सिंधुदुर्ग) :14 वर्षे वनवास रामाचा, 17 वर्षे वनवास मुंबई गोवा महामार्गाचा अशा घोषणा देत मनसे आमदार राजू पाटील कोकण जागर यात्रेतून पायी चालत जात आहेत. मनसेच्या कोकण जागर यात्रेला सुरुवात झाली आहे. मनसे आमदार राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली जागर यात्रा सुरू झाली असून नागोठणे ते खांब 15 किलोमीटर पायी जागर यात्रेला सुरुवात झाली आहे. मुंबई गोवा महामार्ग गेली 15 वर्षे रखडलेला आहे या मार्गामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपा बरोबरच मनसे देखील आता या महामार्गावर आक्रमक झालेले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण कल्याण डोंबिवलीमध्ये कोकणवासियांसोबत संवाद साधत आहेत. तर दुसरीकडे मनसे आमदार राजू पाटील मुंबई गोवा महामार्गावर कोकण जागर यात्रा करत आहेत.
![](https://aplasindhudurg.in/wp-content/uploads/2023/08/whatsapp-image-2020-07-08-at-12.14.45-am_202007453329.jpeg)