खुमखुमी आहे तर या लोकसभेच्या मैदानात, तिसऱ्यांदा पराभव करू

कणकवली (प्रतिनिधी) : गद्दारनी मोठा आघात शिवसेनेवर केला. मात्र तरीही उद्धव ठाकरे डगमगले नाहीत.माझे सर्वसामान्य शिवसैनिक महाराष्ट्रात जनता माझ्यासोबत आहे या विश्वसाने उद्धव ठाकरे महाराष्ट पिंजून काढत आहेत.सातत्याने आपण जनतेला फसवून जिंकू शकतो हा काहींचा समज झालाय. ठाकरे कुटुंबावर तोंडसुख घेणाऱ्या राणेंचा दोन वेळा शिवसेनेने पराभव केला आहे.खुमखुमी असेल तर लोकसभा लढा, मायभूमीत तिसऱ्यांदा तुमचा पराभव करू असे आव्हान शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिले.

error: Content is protected !!