खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील साळिस्ते या गावचे रहिवासी तथा साळीस्ते गाव तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष व साळीस्ते बौद्ध विकास मंडळाचे माजी अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते श्री.बबन ऊर्फ जनार्दन गोविंद कांबळे यांचे नुकतेच दी.२९/७/२०२३ रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी साळिस्ते बौद्धवाडी येथे दिर्घ आजाराने दुःखद निधन झाले.
कालकथित बबन कांबळे साळिस्तेकर हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत कार्यरत असतांना त्यांनी अनेकांना महापालिकेच्या सेवेत कामाला लावून मदतही केली अन् मार्गदर्शनही केले. ते साळिस्ते गावचे तंटामुक्ती अध्यक्ष असतांना, गावाला तंटामुक्त करुन त्यांनी गावाला शासनाचे बक्षिसही मिळवून दिले होते. नुकताच, माहे मे २०२३ मध्ये त्यांचा लग्नाचा वाढदिवस त्यांच्या कुटुंबांने साजरा केला होता. त्यांच्या पश्चात मुले, सुना, भाऊ, जावई, नातवंडे असा फार मोठा परिवार आहे. त्यांच्या निघून जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.