महिलांना महिना दीड हजार रुपये देण्याचा निर्णय हा क्रांतिकारी – नितेश राणे

मुंबई (प्रतिनिधी) : सर्व समावेशक आणि सर्वच घटकांना न्याय देणारा आजचा आमच्या महायुती सरकारचा अर्थसंकल्प आहे. प्रत्येक बॉलवर सिक्स आमच्या सरकारने मारलेला आहे. महिला,माता भगिनी याना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये देण्याचा क्रांतिकारी निर्णय आमच्या महायुती सरकारने घेतलेला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यातील महिला भगिनी आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास बळ मिळेल.असा विश्वास भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना व्यक्त केला.

error: Content is protected !!