आचरा (प्रतिनिधी): पळसंब गावातील विजेश सतिश सावंत हे ठाणे कणकवली असा रेल्वे प्रवास करत असताना जनरल डब्यातील गर्दी मुळे विजेश डब्याच्या बाहेर फेकला गेला आणि दुर्दैवाने विजेशचा एक पाय गुडघ्याच्या खाली आणि दुस-या पायाची चार बोटे अर्थातच दोन्ही पाय रेल्वे अपघातात विजेशला गमवावे लागले विजेशवर मुंबईतील केईएम तसेच सायण हाजीअली अशा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आज आमदार साहेबांनी विजेशच्या घरी भेट घेऊन सविस्तर चर्चा करत आर्थिक मदत तर केलीच आणि इथुन पुढे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले सोबत आचरा विभाग प्रमुख, चिंदर ग्रामपंचायत सदस्य पप्पू परुळेकर माजी सरपंच चंदू गोलतकर जेष्ठ शिवसैनिक प्रमोद सावंत उपस्थित होते