कणकवली (प्रतिनिधी) : राज्यात सर्वाधिक ९८.३३ टक्के एवढा निकाल लागला आहे. यात दोडामार्ग आणि वैभववाडी तालुक्याचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर मालवण तालुक्याचा ९९.२० टक्के, सावंतवाडी तालुक्याचा ९९ टक्के निकाल लागला आहे. कणकवली तालुक्याचा निकाल ९८.१७ टक्के, वंगुर्ले ९८.३९ टक्के, कुडाळ तालुक्याचा ९७.६९ टक्के आणि देवगड तालुक्याचा ९६.९० टक्के निकाल लागला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बारावी परीक्षेत राज्यात डंका ! ९८. ३३ % सह राज्यात प्रथम











