मोबाईल दुकानमालकाला पुन्हा व्यवसाय उभारणीत व्यापारी संघाचे असणार सहकार्य

तालुका व्यापारी संघ पदाधिकाऱ्यांनी जळीत मोबाईल दुकान चे मालक चौधरी ना दिली ग्वाही

व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानाचा विमा उतरवावा – दीपक बेलवलकर

कणकवली (प्रतिनिधी) : पटवर्धन चौकातील लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्स मधील जयश्री मोबाईल शॉपी ला आग लागून दहा लाखांहून अधिक नुकसान झाले. दुकानमालक कृष्णा चौधरी यांची भेट घेत कणकवली तालुका व्यापारी संघ पदाधिकाऱ्यांनी चौधरी याना धीर दिला. पुन्हा व्यवसाय उभारणीसाठी चौधरी याना तालुका व्यापारी संघ सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर, सचिव विलास कोरगावकर यांनी दिली. दुर्घटना घडल्यानंतर होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सर्व व्यापारी बांधवांनी आपल्या गोडाऊन तसेच दुकानातील वस्तूंचा विमा उतरवावा असे आवाहन यावेळी तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर यांनी केले. यावेळी तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर , उपाध्यक्ष राजन पारकर, सहसचिव राजन राजाध्यक्ष, सचिव विलास कोरगावकर, प्रभाकर कोरगावकर, बंडू खोत, सुरभा गावकर, हेमंत गोवेकर संतोष काकडे, चन्द्रेश पहूजा, नंदू आळवे, अशोक करंबेळकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!